दसरा सणांची संपूर्ण माहिती
दसरा हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा हिंदू सण आहे, जो दरवर्षी देशभरातील भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला हा उत्सव होतो. या धार्मिक आणि पारंपारिक सणाची माहिती प्रत्येक मुलाला असायला हवी. ऐतिहासिक मान्यता आणि प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ रामायणानुसार भगवान रामाने रावणाचा वध करण्यासाठी चंडी देवीची पूजा केली.
शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय. त्यामुळे दसरा (information about dasara in marathi) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हे पर्व रामायणातील कथेशी संबंधित आहे.
असं मानलं जातं की, या दिवशी भगवान राम यांनी अहंकारी लंकापती रावणाचा वध केला होता. तेव्हापासून दसरा हा सण (dasara festival information in marathi) साजरा केला जाऊ लागला.
या दिवशी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर काही ठिकाणी विजयादशमी च्या निमित्ताने खास रावणाच्या पुतळ्याचं दहनही केलं जातं आणि सोबतचं दशावताराचे, रामलीलेचंही आयोजन आवर्जून केलं जातं.
हा सण दरवर्षी अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. धार्मिक कथेनुसार या दिवशी भगवान रामाने अत्याचारी रावणाचा वध केला होता. विजयादशमीच्या दिवशी(dasara mahiti in marathi) माता दुर्गेने महिषासुराचा वध केल्याचीही आख्यायिका आहे. आणि यामुळेच देशातील काही भागात या दिवशी माता दुर्गेची षोडशोपचारे पूजा केली जाते.
दसऱ्यासंबंधीच्या आख्यायिका
भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या वनवासादरम्यान एक दिवस जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं. तेव्हा भगवान राम यांनी आपली पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण केलं.
या दरम्यान रामाची वानर सेना आणि रावणाची राक्षसी सेना यांच्यात महाभयंकर युद्धही झालं. ज्यामध्ये रावण, मेघनाथ, कुंभकर्ण यासारख्या सर्व राक्षसांचा वध झाला. एवढंच नाहीतर दसऱ्याचा सण हा रावणाला पराभूत करून भगवान रामाला मिळालेल्या यशाच्या आनंदात साजरा केला जातो.
असे मानले जाते की माणूस आपल्या दुष्कृत्याला जाळून घरी परतला आहे, म्हणून त्याचे स्वागत केले जाते. यानंतर ती व्यक्ती शमी पत्र देऊन आणि ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेते.
अशा रीतीने घरातील सर्व लोक शेजारच्या व नातेवाईकांच्या घरी जाऊन शमी पत्र देतात व मोठ्यांचा आशीर्वाद घेतात, लहानांना प्रेम देतात आणि समवयस्कांना मिठी मारून आनंदात सहभागी होतात.
एका ओळीत म्हंटले तर हा सण म्हणजे परस्पर संबंध दृढ करणे आणि बंधुभाव वाढवणे, या सणाच्या माध्यमातून मनातील द्वेष आणि द्वेषाचे मिश्रण पुसून मानव एकमेकांना भेटतो. अशा प्रकारे, हा सण भारतातील सर्वात मोठ्या सणांमध्ये गणला जातो आणि पूर्ण उत्साहात साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा
उत्तर भारतात दसरा म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहन आणि रामलीला यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात. तर महाराष्ट्रात दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपट्याची पानं म्हणजेच प्रतीकात्मक सोनं लुटण्यात येतं.
आपट्याची पानं सोनं म्हणून आपल्या नातलगांना आणि मित्रपरिवाराला आवर्जून दिली जातात. तसंच दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी गृहप्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी अशी सर्व चांगली कार्य हमखास केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात दसरा सण आवर्जून आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून शस्त्रास्त्रांची पूजा ही केली जाते. तसंच काही जण आधुनिक युगातील शस्त्र म्हणून लॅपटॉप आणि चोपडी पूजनही करतात. झेंडूची फुल वापरून आणि सरस्वती काढून खास वही-पुस्तकाचं पूजन केलं जातं.
या दिवशी खास खरेदी केली जाते. घराला छान झेंडूच्या तोरणाने सजवलं जातं. घरी गोडाधोडाचं जेवण करून या दिवसाला जल्लोषात साजरं केलं जातं.


If you want to use your preferred UPI app, our UPI ID is raj0nly@UPI (you can also scan the QR Code below to make a payment to this ID.